अरुणाचल प्रदेश भारताचाच   

चीनला खडसावले

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो राहणार आहे, अशा शब्दांत भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने  चीनला खडसावले आहे. चीनने अरुणाचल प्रदेशातील अनेक भागांची नावे बदलली असून चिनी भाषेत त्यांचे नामकरण केले आहे. या बाबीला भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे.  चीनने कल्पकतेने राज्याच्या भागांचे नामकरण केले आहे. मात्र, अशी नावे बदलण्याच्या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

 

Related Articles